“या मातीच्या सेवेसाठी” हे गीत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याचा आविष्कार ठरत आहे. प्रत्येकाच्या ओठावर आलेले हे गीत म्हणजे जनतेच्या भावनांचा एक सुरेल प्रतीक बनले आहे. हे गीत त्यांचा दूरदृष्टीकोन, विकासाची बांधिलकी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतिक आहे.
https://youtu.be/vauCbzKP5U4?si=4yX9UYfzlSWI0ZZt
बल्लारपूर मतदारसंघाचा विकास हेच मुनगंटीवार यांचे मुख्य ध्येय आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रात बारामतीच्या विकासाची चर्चा होई, तेव्हा लोक म्हणत असत की आमच्या परिसराचा विकास बारामतीसारखा व्हावा. पण आज परिस्थिती बदलली आहे, कारण बल्लारपूर मतदारसंघाचा विकास जनतेच्या ओठी चर्चा होण्यासारखा ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात केलेल्या कामामुळे सुधीर मुनगंटीवार आता जनतेच्या नजरेत स्टार बनले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने आणि प्रयत्नांनी या भागात विकासाचे मापदंड उभारले आहेत.
मुनगंटीवार यांनी बल्लारपूर आणि परिसराच्या सुधारण्यात केलेली कामे अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांनी मूल नगरीचा चेहरा बदलला, बल्लारपूरात विकासाची गंगा आणली, आणि पोंभूर्ण्याला नवी ओळख दिली. त्यांनी मतदारसंघातील गावोगावी रस्त्यांचे काम चकचकीत केले, खेडेगावांना एकमेकांना जोडले. शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय केली, नदीवर बंधारे बांधले, आसोला मेंढा तलावाचे पाणी शेतांपर्यंत पोहचवले. शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयाचे लाभ मिळवून दिले, ज्यामुळे धान, भाजीपाला, फळ उत्पादकांना नवी दिशा मिळाली आहे.
कृषी महाविद्यालयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मत्स्यपालनाच्या क्षेत्रात देखील सुधारणा केल्या आहेत, तलावाची दुरुस्ती केली, शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला. सिंचनवाढीसाठी मामा तलावाचे खोलीकरण केले, जेथे उन्हाळ्यात देखील तलावात भरपूर पाणी राहते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उन्हाळी पीकांसाठी फायदा मिळतो. या सगळ्या कामांमुळे मूल, बल्लारपूर आणि पोंभूर्णा येथील परिसरात मोठा बदल झाला आहे.
मुनगंटीवार यांचे कार्य फक्त शहरात मर्यादित नाही, तर ग्रामीण भागातील प्रवाशांना सोयीस्कर प्रवासासाठी बसस्थानकांचा दर्जा उंचावला आहे. नवीन बसेस आणून प्रवाश्यांना अधिक आरामदायक प्रवास सुविधा दिल्या आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीपासून सौंदर्यीकरणापर्यंत सर्व स्तरांवर त्यांनी परिश्रम घेतले आहेत. यामुळे शहरांचे सौंदर्य आणि आधुनिकतेचा स्पर्श मिळाल्याने पुणे-मुंबईच्या लोकांनाही चंद्रपूरकडे वेगळ्या नजरेने बघायला लावले आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये देखील त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याप्रती आपुलकीची भावना निर्माण केली आहे. आज अधिकारी वर्ग जनसामान्यांच्या विकासासाठी उत्तम प्रकारे कार्य करतात. सुधीर मुनगंटीवार यांचे नेत्रृत्व त्यांना प्रेरणा देते आणि त्यांची कार्यशैली अधिकारी वर्गासाठी दिशादर्शक ठरते. मुनगंटीवार यांचे “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण” हे सूत्र, क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीने रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना नवे रोजगाराचे मार्ग मिळाले आहेत. विकासात रोजगार निर्मितीला विशेष स्थान मिळाले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ताडोबा सफर आणि विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित करून, त्यांच्या शिक्षणात प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे स्वप्न आहे की चंद्रपूर जिल्ह्याचा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळावा आणि यासाठी त्यांनी विविध सुविधा निर्माण केल्या आहेत.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकास सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. या मातीच्या सेवेसाठी ते अजून बरेच कार्य साध्य करण्यास समर्पित आहेत. मुनगंटीवार यांच्याशिवाय या क्षेत्राला अशी दूरदृष्टी लाभणार नाही, हे सत्य आहे.Sudhir Mungantiwar, Ballarpur constituency development, Chandrapur district progress, Maharashtra politics, public service leader, visionary leadership, rural development Maharashtra, infrastructural growth, Maharashtra public welfare, agricultural improvement, water resource management, local development Maharashtra